Sunday, November 21, 2021

शांतता

 मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी

आठवणींच्या प्रवासाला

स्थगिती कुठे कळावी 


कधी न पाठवलेली पत्रं

खूप काही बोलू पाहतात 

न कळलेली अपूर्ण गोष्ट 

ते बरोबर सांगतात 


या अपूर्ण गोष्टीला 

समाप्ती कधी भेटावी

मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी


पाहिलेली वाट 

सार्थकी लागेल का 

भेट होईल वा 

वेळ लागेल का 


या वाट पाहण्याच्या कार्यक्रमाला 

सांगता कधी मिळावी 

मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी


वयाच्या प्रत्येक टप्प्यातील 

काही ओल्या आठवणी 

अजूनही परत बघायला लावतात 

आठवू नको म्हणता

कुठल्यातरी कोपऱ्यातून 

प्रत्येक वेळेला डोकावतात 


डोकावणार्‍या आठवणींच्या खिडकीला 

बंदी कधी घालावी 

मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी


निसर्गाच्या सानिध्यात  

फेरी एक मारून बघावी

हवेची एक झुळूक 

अनुभवून घ्यावी 


हवेची ती झुळुक 

आतपर्यंत कधी जावी 

मनातील क्लिष्ट प्रश्नांना

शांतता कुठे मिळावी


-गिरीश सोनवणे 

All content subject to copyright 

फुले आणि देव

बर्‍याच काळानंतर
ऋतूंच्या खेळानंतर
बहरलेली ती फुले
आज देवाला पावली

निसर्गाने मेहनतीने केलेल्या
संगोपनाची कथा
एका क्षणात सार्थकी झाली
बहरलेली ती फुले
आज देवाला पावली

ऊन, वारा, पाणी
सगळ्यांचे परिपूर्ण मिश्रण
त्या कळीला वाढवण्यात
दिवसरात्र झटलेले असते
कळीपासून आलेली ती फुले
क्षणात झाडापासून वेगळी झाली
बहरलेली ती फुले
आज देवाला पावली

सुईच्या टोकातून
एकसंध धाग्यातून
प्रवास करून
देवाला पुजण्यासाठी
त्यांची माळ सज्ज झाली
बहरलेली ती फुले
आज देवाला पावली

प्रसन्न भक्तांनी ती माळ
देवाला समर्पित केली
देवालाही ती छान भासली
बहरलेली ती फुले
आज देवाला पावली

सगळं काही समर्पित करून
फुले स्वतः मात्र कोमेजून गेली
कोमेजलेल्या फुलांना देव नाही म्हणाला
भक्तांनी सारी फुले कडेला टाकून दिली
स्वतः संपूनही आनंदी राहिली
कोमेजलेली ती फुले
आज देवाला पावली

- गिरीश सोनवणे


All content subject to copyright

आठवणी

ज्या मनापासून आनंद देतात त्या आठवणी पुन्हा जगावयाशा  वाटतात. जसे की बालपण. शाळा, परिपाठ, पकडापकडी, लपाछपी , मित्र मैत्रिणी, गृहपाठ, शिक्षक हे सर्व आठवतात. सगळ परत कराव वाटत. कॉलेज life पुन्हा जगा विशी वाटते. एखाद्या आवडत्या व्यक्ति ला पुन्हा बघाव वाटत. त्याच वेळ ला झालेल्या चुका कुणालाच कधीच दिसू नयेत अस वाटत. ग्लानी, निराशा सर्व काही विसरावे वाटते. हृदयाला लागलेल्या गोष्टी विसरून जाव्यात अस वाटत. पण ते अशक्य. जे धूसर असत ते विसरायचा प्रयत्न करायला गेल की त्या आठवणीला आपण पुन्हा गिरवतो आणि ती गडद होते 🤞🤞 

व्यक्त होणे

 व्यक्त करणं सोप आहे.. जस्ट आपल्याला  जे म्हणायचंय ते बोलायच आहे किंवा दाखवायचे आहे.. पण त्यासाठी लागणारा आत्मविश्वास, एनर्जी, तयारी यासाठी खूप वेळ लागतो. कधी कधी व्यक्त न होने हेच चांगले असते, उगाच व्यक्त होत राहन हे आपलीच किम्मत कमी करते. कोणालाही इतरांचे प्रॉब्लेम मध्ये इंट्रेस्ट नसतो. आणि आनंदात पण नाही. असला तर काही क्षणापुरता असतो...मनातले सगळे बोलून टाकत जा ह्या motivational lines फक्त instagram पुरताच मर्यादित ठेवा.. नुसत मनातल सगळ्याना सांगत बसल तर एक दिवस तुमचीच किम्मत कमी होईल.. व्यक्त होणे सोपे असले तरी अव्यक्त राहणे एक कला आहे... जो व्यक्ति नेहमी व्यक्त होत नाही त्याच्या व्यक्त होण्याला किंमत असत. तर कधी कुठे कस व्यक्त व्हायचे हे समजल पाहिजे.. नाही का?

एखादी गोष्ट खटकत असेल तर ......

खटकत असलेली गोष्ट दुर्लक्षित करावी नाहीतर सोडून द्यावी.. नात सोडावे की नाही हे तुमच्यासाठी ते नाते किती महत्त्वाचे आहे त्यावर depend...कधी कधी जर तुम्हाला confidence असेल की तुमच भविष्य चांगल होईल तर नात्यापासून दूर राहू शकता काही काळ.. आणि एखादी गोष्ट का खटकते ते एकदा चेक करून पहा. कदाचित विनाकारण च आपण त्या गोष्टीचा तिरस्कार असू आणि ती एखादी छोटीशी गोष्ट असेल. दुसर्‍याच्या नजरेने परिस्थितीकडे पाहील तर चूक कळेल कोणाची आहे ती 😊हे फक्त माझ मत, उत्तर नाही 🤞🤞 

Attitude

 Attitude म्हणजे दृष्टिकोन. तो  positive किंवा  negative असतो.. पण आपण हा शब्द गर्व वगैरे चा समानार्थी  म्हणून वापरतो. सो  attitude आपल्यापुरता असावा. खूप असला तरी फक्त आपल्यापुरता. जर एखादी व्यक्ति तुमच्याशी नीट बोलत असेल तर आपणही नम्रपणे बोलाव. आपल्याला काही जास्त येत, आणि आपण सुंदर आहोत, श्रीमंत आहोत या गोष्टींचा attitude ठेवायचा नाही. माझ्यासमोर तरी सर्वानी त्यांचा attitude खिश्यात ठेवावा असा आपला attitude असावा . Attitude या गोष्टीचा ठेवावा की आपण पूर्ण मेहनत  केलीय, आपण positive आहोत, आणि आपण कोणापेक्षा कमी नाही. हा attitude अन confidence असावा.  

आयुष्यावर प्रेम का कराव?..

आयुष्य हे तुमच्याकडे limted आहे. त्यातल्या त्यात वेळ हातात असलेल्या वाळू सारखी सरकत जाते. उद्याचा ही काही भरवसा नाही. शरीराची ही वापराची expiry डेट असते. बुद्धी, डोळे, मन, स्पर्श, चव, सगळे आहे आयुष्यात मिळालेल. आनंद, दुःख हेही अनुभवता येत. सगळ्या प्राण्यांप्रमाणे ch आपण आहोत तरी आपल्यात खूप काही जास्त आहे. या सगळ्या गोष्टी अमूल्य आहेत. पण वेळ कमी आहे. 100 वर्षे अशीच निघून जातात.

आणि पुन्हा मागे येता येत नाही. आणि या आयुष्यानंतर काही आहे की नाही याचीही काही खात्री नाही. तर या आयुष्याची एवढी जास्त किम्मत असेल तर त्याला आपण जपायला हव, आणि जगायला हव. म्हणून प्रेम कराव आयुष्यावर.   

ऑनलाईन शिक्षण- शिक्षक, विद्यार्थी, syllabus आणि परीक्षा

हल्ली सर्व काही पुन्हा पूर्ववत होत चाललंय. पुन्हा लोकांची कामे सुरु झालीत, कुठे हॉटेल्स वगैर पण चालू झालेत. रिक्षा, taxi, बस वगैर पण सुरु झालेत. आता कुठेतरी सर्व काही चालू होताना दिसतंय. त्यासोबत पुन्हासारखी घाई आणि वर्दळ हि दिसतेय. मास्क लावणे हे आधी वेगळेच वाटायचे पण सध्या ते सर्वांच्या दैनंदिन चालीरीतीत बसले आहे. नाही म्हणता म्हणता सर्व जणांनी कोविड चा हा धर्म स्वीकारलाच म्हणयला लागेल.

यात परत सुरु झाले नाहीत ते शाळा आणि कॉलेज. ऑनलाईन lecture आहेत. खरा वर्ग आणि ऑनलाईन वर्ग यात काहीसा फरक तर आहेच. पण त्या माध्यमातून तरी शिक्षण सुरु आहे म्हणजे देव पावला. सुरुवातीला खूप साऱ्या अडचणी यायच्या. शिक्षक हि ऑनलाईन पद्धत शिकत होते, विद्यार्थी हि थोडेसे घाबरत होते, शिकत होते. नेटवर्क चाही भरपूर प्रोब्लेम होता खूप ठिकाणी. पण आता सर्व काही जवळपास ठीकठाक झाले आहे. आता सर्व नॉर्मल आहे असे वाटते.

ऑनलाईन म्हटल कि शिक्षक आता कुठून तरी PPt डाउनलोड करून घेतात आणि आपल शिकवायला सुरुवात करतात. काही शिक्षक स्वतः ppt बनवतात आणि शिकवतात. काही समजावून सांगतात. काही फक्त एकदा ppt घेतली कि फक्त वाचतात. जे लिहिलंय तेच एका लाईन मध्ये परत बोलतात आणि झाल. आणि syllabus पटापट कसा संपेल याच्या मागे असतात. या सगळ्या गोष्टी पण बदलयला हव्यात.

एक semester सहा महीन्याच असत, आता ते एका दोन महिन्यात उरकवून त्यात परीक्षा पण घेऊन होतात. या पद्धतीत खरच विद्यार्थ्याला गुणवत्ता मिळते का? practical ची परीक्षा घेतात, पण practical नाही , मग हे practical चे गुण काय उपयोगाचे? नाही का . व्यावसायिक अभ्यासक्रमात तरी practicals व्हायला हवेत, त्याशिवाय ते शिक्षण व्यावसायिक कसल ?

विद्यापीठाला तरी कळायला हव कि एक दोन महिन्यात एवढा अभ्यासक्रम खरच विद्यार्थ्यांना समजतो का? त्यांना गुणवत्ता मिळतेय का? जर असेच चालत राहिले तर , व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणता म्हणता हा फक्त पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम आहे अस म्हणाव लागेल.

या सगळ्यात चार महत्त्वाचे भाग म्हणजे शिक्षक, विद्यार्थी , कॉलेज आणि विद्यापीठ. या सर्वात समन्वय असला कि सर्व काही व्यवस्थित होईल. विद्यार्थ्याने हि आपली जवाबदारी समजायला हवी. हे सर्व overall मित्र, विद्यार्थी आणि एकंदरीत सर्व परिस्थिती याच्यावरून मांडल. आता बऱ्यापैकी सर्व नीट दिसतंय. शिक्षणाच्या बाबतीत सध्या तरी सर्व काही सुरळीत चाललंय, पण विद्यापीठाशी असलेली तक्रार कधी निस्तरेल अस सध्या वाटत नाही.

पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय

आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्रीनसमोर जाऊन बसलो. काही नवीन आलय का हे बघायचं असत. मग इमेल , twitter website वगैर आलंच त्यात. सगळ चेक्क करत असताना वाटल कि आज काहीतरी लिहावं. लिहायला बसलो मग. समोरच लिहिण्यासाठी कोर पान open झाल.मग त्यात काय लिहावं सुचेनास झाल. काही लिहावं पण मग आवडल नाही कि backspace दाबून सर्व पुसून टाकाव असच चालल खूप वेळ.मग वाटल लिहू नये आणि मग सगळ पुसून आल ते परत कोर पान. आज एकतर वातावरण खूप छान आहे. थंड हवा आणि मंद नवा प्रकाश. सर्व काही छान. पण लिहायला काहीच नाही.मग फक्त त्या white स्क्रीन कडे पाहत बसलो.

मग मला असच वातावरण पाहून आधीचे दिवस आठवले. आधीचे म्हणजे शाळेच्या वेळेचे जेव्हा मी तिसरी चौथीला असेल. आमची शाळा ... म.न.पा. शाळा क्रमांक ९९ . शनिवारी सकाळी शाळा असायची. वातावरण सेम आज सारखेच बर का . थंड हवा सूर्य नुकताच उगवणार असायचा. आम्ही कंपनी च्या एका रूम मधेच राहायचो . पण पूर्ण परिसरात कोणीच नसायचं कारण सगळ्या कंपन्या बंद असायच्या. सकाळी लवकर उठून, शाळेचा गणवेश घालून तयार असायचो. खूप भारी वाटायचं शनिवारची शाळा म्हणजे. आम्ही दोन तीन मित्र पायीं पायी शाळेत जायला निघायचो. थंडी असो काही असो कुडकुडत का होईना शाळा मात्र आवडायची. मग हळू हळू तो रस्ता चालत जायचो. कोणीतरी शेकोटी करत असल कि थोड्या वेळ बसायचो आणि परत शाळेला. थोडी मस्ती करत कधी शर्यत लावत तो लांबचा रस्ता पूर्ण करायचो. हे सगळ आज आठवल कि खूप छान वाटत.

शाळेत जाऊन परिपाठाला उभ राहायचं , लेट झाला कि छड्या खायच्या. परिपाठ तर असायचा त्यासोबत कवायत पण असायची शनिवारी. अशे अवघड अवघड व्यायाम करायला लावायचे कि काही विचारूच नये. अवघड नसायचे पण खूप वेळ त्या band आणि खुळ्खुल्याच्या आवाजावर तेच तेच परत करत राहायचे. नाही केल तर सर मागेच उभे असायचे. कधी band कधी पिआनो वापरून शिक्षक जणू आमच्यावर प्रयोगच करायचे. प्रार्थना सुविचार वगैरे आटोपलं कि मग कुठेतरी वर्गात न्यायचे. मग कसातरी वर्ग भरायचा. शिकवण काही व्हायचं नाही शनिवारी.

हजेरी वगैर द्यायची आणि कधी एकदा जेवणाची सुट्टी होते ती वाट बघायचो. मग दरवाज्याच्या चौकटीतून खिचडी वाल्या मावशी दिसल्या किवा त्यांची रिक्षाचा आवाज आला कि लगेच कळायचे कि आता सुट्टी होणार. मग एकदा घंटा वाजली कि आपापला डबा घेऊन सर्व जन तो संपवायचो लवकर आणि मग खेळायचो. कधी जोडीची साखळी कधी चोर पोलीस कधी पकडापकडी. खूप मजा असायची जणू हेच life होत. काहीच टेन्शन नाही. मग सुट्टी झाली कि घरी जायचं आणि दिवसभर नुस्त खेळायचं आणि खेळायचं.

किती छान होत सगळ. आता ते सर्व आठवल कि अस वाटत परत वेळेत मागे जावं आणि परत तसच सगळ कराव.

आता मग हे सगळ स्क्रीन वर उतरवल आणि मग मनाला कुठे बर वाटल. माझ्या मताने तुम्हाला पण आठवत असेल तुमची शाळा आणि अश्याच काहीतरी आठवणी असतील ना ! वाटल तर comment मध्ये share करा .

ते पुढे गेलेत मग तू मागे का ?

प्रत्येकाच आयुष्य , इंग्रजीत म्हणायला गेल तर life हे वेगवेगळ असत. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त असतो मग तो सुखी असो वा दुखी. बरोबर ना. पाहिजे असते फक्त शांती .मनाची शांती. आपल्याला स्वतःच मोठ अस घर असाव , त्यात सार्‍या सुविधा असाव्यात, त्यासाठी खूप पैसा असावा आणि चार लोकानी आपल्याला ओळखाव ,आपल ऐकाव अस  आयुष्य म्हणजे सुखी आयुष्य होय अशी सर्वांची मान्यता आहे . 

अगदी माझी पण बऱ्यापैकी तशीच धारणा आहे. अन यात वाईट काय ? काहीच नाही. अगदी आई,वडील भाऊ,बहिण सर्व जर खुश असतील तर आपल्याला आणखी काय हव ,नाही का . आता हे सर्व सगळ्यांनाच मिळेल अस तर नाही . कदाचित मिळूही शकेल. प्रयत्न तर आपण सगळेच करतोय . पण सगळ्यांना हे एकाच वेळी मिळेल हे शक्य आहे का . सांगा तुम्हीच. शक्य असेल तर मला आश्चर्य होईल . 

जर तुमच उत्तर नाही असेल तर तुम्ही माझ्यासारखे विचार करणारे असाल बहुतेक. आपण आपल कर्म करत राहायचं फळाची अपेक्षा न करता . पण फळ हे मिळणार हे माहिती . अस कुठेतरी ऐकलय. किवा वाचलंय. आपल्या आयुष्यात आपली जी स्थिती आहे त्यासाठी आपणच प्रयत्न करायचे असतात हव तर इतरांची मदत घ्यायची असते . पण आपण हातपाय मारल्याशिवाय आपल्याला पोहोता येत नाही तसच आयुष्याच. आपल्याला कोण काय म्हणतय लोक काय म्हणताय याने फरक नसला पडत तरी घरातील मंडळी आणि समाज याची जाणीव नक्की करून देत असतात. 

उदाहरण द्यायचं झाल तर अमुक व्यक्ती खूप पुढे गेलीय आणि आपण मात्र जिथे आहेत तिथेच आहोत अस सांगण. नक्कीच त्या व्यक्तीने परिश्रम घेतले असतील अन ती व्यक्ती पुढे गेली असेल , पण मग आपण काहीच नाही केल असा त्याचा अर्थ होतो का .  प्रत्येकाची शक्ती , विचार करण्याची पद्धत , त्याची परिस्थिती ,त्याला मिळालेली लोकं सर्व वेगवेगळ असत . तुम्हाला यशस्वी व्यायच असेल तर तुमच्यात ईर्ष्या असणेही गरजेचे आहे. पण लोकांनी अस म्हणणे कि तुम्ही का यशस्वी होत नाही आहात , समोरच्या अमुक व्यक्तीने बघा किती कमी वयातच आपल आयुष्य सुधारल , हे ऐकून एकदम स्वतःला कमी समजणे हि माझ्यामते चुकी आहे. 

जगातील सर्वात श्रीमंत लोक काय एकाच वयात श्रीमंत झालेत का ? सर्व यशस्वी माणसे अगदी लहान वयातच यशस्वी होते का ? कदाचित नाही . हो न . आपल्याला त्याच्यासारखं आयुष्य मिळवायचं आहे म्हणून यश मिळवण्यासाठी घाई करायची , याचा काही उपयोग नाही. यात सगळ काही लवकर मिळवण्याच्या चक्कर मध्ये तुम्ही मात्र स्वतःला जो वेळ दिला पाहिजे , ज्या गोष्टी शिकल्या पाहिजे त्या वरचेवर शिकतात आणि मग जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगात पडतात तेव्हा तुमच्या अपूर्ण कलेला आणि ज्ञानाला काही किंमत नसते आणि यशापासून तुमची दुरी वाढतच जाते .

दुसर्यांच्या यशाच्या गतीला पाहून त्यांच्यासारख पटकन यश मिळवण्याच्या मागे लागण्यापेक्षा स्वताच्या गतीने पूर्ण ज्ञान आत्मसात करून मग वाटचाल  केलेली बरी. लोक तर तुम्हाला म्हणतील कि बघ ते तुझ्या पुढे निघून गेलेत आणि तू मागे , पण हे ऐकून स्वतःला कमजोर किवा निराश करून घेण्यापेक्षा किवा घाई करण्यापेक्षा आपण आपल्या क्षमता लक्षात ठेवाव्या आणि हे लक्षात ठेवाव कि प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते . आज त्याची वेळ आहे उद्या माझी असेल . 

आजच्या ब्लॉग मध्ये कोणताही फोटो नाही टाकला याच कारण म्हणजे बघायचं आहे कि कोणा कोणाला अगदी विना फोटोंच वाचनाची आवड आहे . तुमच्या प्रतिक्रिया comments मध्ये नक्की द्या तुम्हाला काय वाटत . 


पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय

आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्री...